ठाणे(जिमाका):- राज्यातील शासकिय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्या चा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाया निर्णया बददल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मंत्रिमंडळाचे अभिनंदन ठाणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्र राज्यपत्रित अधिकारी महासंघाचे ठाणे समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांना पुष्पगुच्छ देवून सर्वांनी अभिनंदन केले. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकिय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी राहील.
यासोबतच दररोज ४५ मिनिटाचे वाढीव काम अधिकारी व कर्मचा- यांना करावे लागेल. या निर्णयाची अंमल बजावणी २९ फेब्रवारी पासून होईल. यावेळी उपअध्यक्ष ठाणे जिल्हा समन्वय समिती डॉ. अवि नाश भागवत, सचिव तथा शिक्षणाधिकारी साहेबराव बढे, सदस्य जिल्हा कषी अधिकारी अंकुश माने, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, जनसंपर्क अधिकारी संगिता पवार कोषाध्यक्ष तथा नायब तहसिलदार सिंधूखडे, महेंद्र सावंत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुंबईसह सर्व कार्यालयांसाठी एकच वेळ सध्या बृहन्मुंबईतील कार्याल यांची कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायं. ५.३० अशी आहे. ती आता ९.४५ ते ६.१५ अशी होईल, शिपायांसाठी कार्याल यांसाठी देखील ही वेळ ९.४५ ते सायं. ६.१५ अशी राहील. बृहन्मुंबई बाहेरील शासकिय कार्यालयांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ५.४५ अशी कामाची वेळ सध्या आहे. मात्र आता पाच दिवसाचा आठवडा केल्यामुळे मुंबई आणि मुंबई बाहेरील सर्व कार्यालयांना एकच वेळ निश्चित करण्यात आली आहे.
सध्याच्या या कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी १ ते २ या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची वेळ देखील अंतर्भूत आहे.यांना लाग नाही | | ज्या शासकिय कार्यालयांना | कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयांना व शासकिय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा| पोलिस दल, अग्निशमन दलसफाई कामगार यांना पाच दिवसांचा आठवडा लागू नाही. ज्या कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागून नाही त्यांची नावे पुढीलप्रमाणे:- अत्यावश्यक शासकर अत्यावश्यक सेवाः
शासकिय रूग्णालये, चिकित्सालये, पोलिस, कारागृहे, पाणीपुरवठा प्रकल्प, अग्निशमन दल, सफाई कामगार, शैक्षणिक संस्था :- शासकिय महाविद्यालये, सैदानिय महाविद्यालये, शाळा, तंत्रनिकेतने, जलसंपदा विभाग:- दापोडी, सातारा, वर्धा, अकोला, अहमदनगर, आष्टी, खडकवासला, नाशिक व नांदेड येथील कर्मशाळा, नागपूर, भंडारा येथील मध्यवर्ती कर्मशाळा तसेच जलसंपदा व सार्वजनिक विभागांतर्गत क्षेत्रिय कामावरील व प्रकल्पांवरील नियमित आस्थापना, स्थायी व अस्थायी आस्थापना व रोजंदारीवरील क्षेत्रिय कामगार व कर्मचारी, सार्वजनिक आरोग्य विभाग:व्हॅक्सिन इन्स्टिीस्टयुट नागपूर, महसूल व वन विभाग :बल्लारशा, परतवाडा व डहाणू येथील एकात्मिकृत घटके, अल्लापल्ली येथील सॉ मिल, विभागीय वन अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील परतवाडा व बल्लारशा येथील वर्कशॉप, शासकिय छायाचित्र नोंदणी कार्यालये, पुणे, सामान्य प्रशासन विभाग:- शासकिय परिवहन सेवेचा कारखाना विभाग, कृषी विभाग : दुग्धशाळा विकास विभागांतर्गत दुग्ध योजना, उद्योग, उर्जा व कामगार विभाग:शासकिय मुद्रणालये, कौशल्य व उद्योजकता विकासः सर्व आयटीआय. केंद्र शासनाप्रमाणे राजस्थान, बिहार, पजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. सध्या दुसरा व चौथा शनिवार कार्यालयीन सुटटी असते. पाच दिवसाच्या आठवडयाच्या प्रस्तावामुळे शासकिय कार्यालयातील वीज, पाणी, वाहनांचे डिझेल, पेट्रोल या खर्चामध्ये बचत होणार आहे. तसेच शासकिय कर्मचा-यांना कुटूंबांना वेळ देणे शक्य होवून त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावेल.